कर्जमाफी योजनेत वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्या; अंधारी सहकारी सोसायटीच्या सभासदांची मागणी
अंधारी येथील सेवा संस्थेसह शेतकरी सदस्यांची मागणी
- क्राईम टाईम्स टीम
- दीपक सिरसाठ
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा
ऑनलाईन Pan कार्ड : पाच मिनिटात डाउनलोड करा ई-पॅन कार्ड ; पहा कसे करावे
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022
अंधारी :शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना प्रोत्साहनपर कर्ज फेड करणार्या शेतकर्यांना तारखेस संदर्भात दिलासा द्यावा,अशा आशयाचे साकडे अंधारी येथील सेवा संस्थेसह शेतकरी सदस्यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे घातले आहेत या निवेदनात म्हटले आहे की ज्या शेतकरी सभासदांनी शासनमान्य योजनेअंतर्गत त्यांनी घेतलेल्या कर्जाची नियमित कर्ज परतफेड एक एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षांत घेतलेले कर्ज हे ३० मार्च २०१९पर्यंत परतफेड केले पाहिजेत.त्याचबरोबर एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ अखेर परतफेड केले पाहिजे याच प्रकारे एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० कर्जाची परतफेड केली असल्यास अशा कर्जास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.शासन अध्यादेशानुसार तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.वास्तविक काही शेतकरी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री लवकर करतात,तर काही शेतकरी मालाची बाजारातील बाजारभाव बघून उशिराने विक्री करतात या सर्व बाबींचा परिणाम त्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या वाटपावर त्याचबरोबर वसुलीवर होत असतो त्यामुळे काही शेतकरी सभासद कर्जाची लवकर परतफेड करून त्याच महिन्यात नवीन पीक कर्ज घेतात तर काही शेतकरी उशिराने कर्ज फेड करुण नवीन कर्ज उचलतात.याचाच एक भाग म्हणून कोरोना सारखी जागतिक महामारीचे संकट आल्यामुळे ज्या शेतकरी सभासदांनी मार्च २०१९ मध्ये घेतलेले कर्ज ते पुन्हा मार्च २०२० या आर्थिक वर्षांत म्हणजेच तीन शे पासष्ठ दिवसांत परतफेड करणे गरजेचे होते परंतु या कर्जफेडीच्या काळात राज्यात लॉक डाऊन असल्याने सर्वत्र बँका शासकीय व्यवस्था व दळणवळणाची साधने पूर्णत बंद होती. त्यामुळे मार्च २०२० कर्जफेड होऊ शकली नाही या कर्जाची परतफेड एक एप्रिल २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीमध्ये झाली तरी असे शेतकरी सभासद या योजनेपासून वंचित राहत आहेत त्यामुळे नियमित कर्ज फेड करणार्या शेतकरी सभासदांनाही तीनशे पासष्ठ दिवसांची अट लावल्याने नाराजी पसरली आहे संबंधित शेतकरी हे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत या सर्व बाबींचा आगामी काळात कर्जवसुलीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी कुठल्याही अटी व शर्ती न लावता तसेच तीन वर्ष आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना कर्जफेड केलेल्या तारखेस संदर्भात दिलासा देऊन योजनेत समाविष्ट करण्यात यावे असे संस्थेसह शेतकरी सदस्यांनी म्हटले आहेत.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज
agriculture बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०% टक्के अनुदान असा करा अर्ज
प्रतिक्रिया
: सुमनबाई नारायण जाधव
(सेवा संस्था अध्यक्ष अंधारी):जागतिक महामारीचे संकट आल्यामुळे ज्या शेतकरी सभासदांनी मार्च २०१९ मध्ये घेतलेले कर्ज ते पुन्हा मार्च २०२० या आर्थिक वर्षांत म्हणजेच तीन शे पासष्ठ दिवसांत परतफेड करणे गरजेचे होते परंतु या कर्जफेडीच्या काळात राज्यात लॉक डाऊन असल्याने सर्वत्र बँका शासकीय व्यवस्था व दळणवळणाची साधने पूर्णत बंद होती. त्यामुळे मार्च २०२० कर्जफेड होऊ शकली नाही या कर्जाची परतफेड एक एप्रिल २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीमध्ये झाली तरी असे शेतकरी सभासद या योजनेपासून वंचित राहत आहेत त्यामुळे नियमित कर्ज फेड करणार्या शेतकरी सभासदांनाही तीनशे पासष्ठ दिवसांची अट लावल्याने नाराजी पसरली आहे संबंधित शेतकरी हे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत या सर्व बाबींचा आगामी काळात कर्जवसुलीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी कुठल्याही अटी व शर्ती न लावता तसेच तीन वर्ष आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना कर्जफेड केलेल्या तारखेस संदर्भात दिलासा देऊन योजनेत समाविष्ट करण्यात यावे.
रावसाहेब भाऊराव तायडे
(शेतकरी सभासद अंधारी) अंधारी येथील सेवा संस्थेत नियमित फेब्रुवारी मार्च १७,१८,१९ कर्ज भरणा करणारे शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहेत गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मी नियमित वेळेवर कर्ज भरतो.परंतु माझे या यादीत नाव नसल्यामुळे माझी चूक काय मला प्रशासनाने याचे उत्तर द्यावे माझ्यासह इतरही अनेक शेतकरी सभासद या योजनेपासून वंचित आहेत प्रशासनाने याचा पुरेपूर विचार करून सर्वांना वगळण्यात आलेल्या सर्वांना सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा
अंधारी सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांना माहिती देताना संस्थेचे सचिव शांताराम सुलताने शेतकरी व संचालक