टाकळी राजेराय : कब्रस्तान वाल कंपाउंड कामांचे उदघाटन
खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथील कब्रस्तानला वाल कंपाऊंड नसल्यामुळे कब्रस्तानमध्ये घनकचरा व अतिक्रमण होत असल्यामुळे वारंवार गावपातळीवर चर्चा होत असल्यामुळे ग्रामपंचायत सतत वाल कंपाऊंड काम करण्यासाठी अल्पसंख्यांक विभागकडे प्रस्ताव पाठवायचे मात्र त्या प्रस्तावाला मंत्रालयात पाठपुरावा नसल्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत पडून राहेचा मात्र यावर्षी सरपंच जुलेखाबी मुस्ताक पटेल, सहकारी जाकिर पटेल, ग्रामपंचायत सदस्य इरफान पटेल यांनी मंत्रालयात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना प्रत्येक्षात भेट घेऊन गावातील कब्रस्तानची समस्या मांडली व सविस्तरपणे चर्चा करून कामांसाठी निधी मंजूर करून घेतला अन् आज त्या कामाचे गावकऱ्यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले यावेळी उपसरपंच गुलाब कुचे, टाकळी राजेराय मस्जिदचे (अध्यक्ष-अमीर) वजीर पटेल, समद मौलाना, गणी मौलाना, माजी सरपंच भास्कर मोठे, हयात पटेल, सदस्य विजय औटे, अहेमद पटेल, अहेमद शेख, प्रकाश कुचे, मुनू पटेल, कमरबाबा शेख, यासिन शेख, कय्युम शेख,जफर पटेल, नदीम पटेल,फारूक पटेल, महेमुद पटेल, जुबेर टेलर, नजीर पटेल, समीर पटेल, ताहेर शेख, जाकिर शेख, शोहेब पटेल, तोसीफ पठाण, अलीम शेख सह इतर ही गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.