September 22, 2024

शेतीच्या वादातून चुलत भावाची हत्या

0
Contact News Publisher
  • औरंगाबाद/ अनिस देशमुख
शेतातील बांधावरून चुलत भावांनी एका तरूणास कुऱ्हाडी आणि लाकडी दांडयाने हल्ला करून निर्घुण हत्या केली निर्घुण हत्या केल्याची घटना आज सायंकाळी चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या परिसरातील चिंचोली गावात घडली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून पोलीसांनी बंदोबस्त लावला आहे.
चिंचोली गावात वाघ कुटुंबियात शेतीच्या कारणावरून चुलत भावांशी वाद सुरु होता. आज शुक्रवारी सायंकाळी कृष्णा रामराव वाघ (३०) हा शेतात नांगरत असताना त्याला चुलत भावाने रोखण्याचा प्रयत्न केला. या वरून वाद झाल्याने तीन ते चार जणांनी कृष्णा वाघ यास  कुऱ्हाडी आणि लाकडी दांडयाने व लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यास नातेवाइकांनी  घाटीत दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्याचा आठच्या वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. यावरून तात्काळ सहायक निरीक्षक महेश आंधळे यांनी पथकासह चिंचोली गावात धाव घेतली. पोलीस आल्याचे कळताच संशयित आरोपींनी गावातून पळ काढला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चिखलठाणा पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया करत होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending