औरंगाबादेत कोरोनाचे बळी शंभरी पार; आणखी तीन बंधितांचा मृत्यू
धक्कादायक न्युज औरंगाबादेत कोरोनाचे बळी शंभरी पार; आणखी तीन बंधितांचा मृत्यू
औरंगाबादेत आतापर्यंत १०२ जणांचा मृत्यू
- क्राईम टाईम्स ब्युरो
औरंगाबाद : कोरोनाच्या बळींच्या संख्येने रविवारी शंभरी पार केली. एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू असताना ३ रुग्णांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १०२ झाली आहे.
अल्तमश कॉलनी येथील ७० वर्षीय पुरुष, देवडी बाजार येथील ६० वर्षीय महिला आणि कैलासनगर येथील ५६ वर्षीय महिलेचा एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अल्तमश कॉलनी येथील रुग्णाचा ६ जून रोजी रात्री ११ वाजता, देवडी बाजार येथील रुग्णाचा ७ जून रोजी पहाटे ३.१५ वाजता आणि कैलासनगर येथील रुग्णाचा ६ जून रोजी रात्री ९.३० वाजता मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.