मंत्री पदाची घोषणा! – ना शिंदे गट, ना भाजप, औरंगाबादच्या पठ्ठ्याने स्वतः ला घोषित केले सामाजिक न्यायमंत्री!
या अगोदर देखील भारत फुलारे यांनी मुख्यमंत्री करा असे पत्र राष्ट्रपतींना लिहिले होते
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
औरंगाबाद : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाले नाही त्यामुळे कुणाचीही मंत्रिपदी निवड झालेली नाही. मात्र, औरंगाबादमध्ये एका पठ्ठ्याने स्वत: सामाजिक न्यायमंत्री घोषित केलं आहे. त्याच्या या प्रतापमुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत
शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली
crop insurance शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान शासन निर्णय आला पहा कोण पात्र आहे
औरंगाबाद शहरातील एका पठ्याने स्वतःला राज्याचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून घोषित केले आहे. यासंबंधीचे बॅनर तयार करून हा पठ्ठ्या स्वतःच्या गाडीवर लावून फिरत आहे. भारत आसाराम फुलारे असे या पठ्ठ्याचे नाव आहे. त्याने लावलेले गाडीवरील बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या अगोदर देखील भारत फुलारे यांनी मुख्यमंत्री करा असे पत्र राष्ट्रपतींना लिहिले होते. नुकताच मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसीय औरंगाबाद दौरा केला. या दौऱ्यातच त्याने ‘मी स्वतःला सामाजिक न्याय मंत्री म्हणून घोषित करतो’ अशी घोषणा केली. विशेष म्हणजे, काही नागरिक या पठ्याकडे आपल्या समस्या घेऊन देखील आल्याचे त्याने सांगितले.
‘संविधानानुसार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणे न्यायिक होते परंतु काही अपरिहार्य कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. परिणामी महाराष्ट्राच्या विविध समस्या वाढत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेवर पोरकेपणाची वेळ आली आणि यामुळे आता जनतेने स्वयंघोषित मंत्रीपदे घेण्याची गरज आहे. यामुळे मी जनतेच्या हितासाठी स्वतः सामाजिक न्याय मंत्री म्हणून घोषित करून जनतेच्या न्याय व हक्कासाठी लढण्याची शपथ घेतल्याचे फुलारे यांनी सांगितलं.
online application 2022 : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र माहिती
कांदा चाळ अनुदान योजना 2022; अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती
नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर