September 22, 2024

समृद्धी महामार्गावर एका चार चाकीला भिषण आग;सुदैवाने चालक आणि प्रवासी सुरक्षित

0
Contact News Publisher

औरंगाबादमध्ये समृद्धी महामार्गावर एका चारचाकी कारला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवाने यात कार चालक आणि प्रवासी सुरक्षित असून कोणतेही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा पार पडला.

मात्र उद्घाटनानंतर अपघाताच्या मालिका सुरु असल्याने समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे. अशातच आता औरंगाबादच्या वैजापूर जवळील गलांडे वस्तीजवळील एका धावत्या कारने पेट घेतला आहे. आगीचे प्रमाण एवढे होते की, कार काही क्षणात जळून खाक झाली आहे. तर आग लागलेली कार पुणे येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, नितीन सिंह राजपूत यांची गाडी असल्याचे देखील समोर आलंय. औरंगाबादच्या वैजापूर जवळील गलांडे वस्तीजवळ एका धावत्या कारला आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ज्यात एक पांढऱ्या कलरची कारला भीषण आग लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. कार कोणती होती याबाबत माहिती मिळू शकली नाही. पण आग एवढी भीषण होती की,काही क्षणात कार अक्षरशः जळून खाक झाली आहे. त्यामुळे गाडीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. पण वेळीच प्रवासी गाडीच्या बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून, औरंगाबाद ग्रामीण पोलिसात याची नोंद करण्यात येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending