‘महाराष्ट्रात लॉकडाऊन नको असेल तर’, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट आदेश
- क्राईम टाईम्स टीम
मुंबई : कोरोनाचा (Corona) नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा. मागील दोन वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन नको असेल तर जे करायचे असेल ते करा’, असे निर्देशच मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहे.
राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारला दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून येणाऱ्या प्रवाशी विमानांची वाहतूक थांबावावी किंवा योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. तसेच राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे.